अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

रविवार, ५ जुलै, २०२०


 *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...?*

*" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. " - गाडगेबाबा*
 
     वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून लोकांना सांगत. ते असे का सांगायचे ?  कारण,  गुरू-शिष्य परंपरेतूनच शब्दप्रामाण्य जपणारा अचिकित्सक समाज निर्माण होत असतो. जो अंधश्रद्धेला नेहमी बळी पडतो. ही बाब ते जाणायचे. आज गाडगेबाबांचे विचार आदर्श म्हणनारे पण त्यांचे वरील वाक्य कदाचित ऐकले नसणारे बरेच लोक , "जीवनात मार्गदर्शनासाठी गुरू गरजेचे असतात." असे म्हणून, गुरूपौर्णिमा साजरी करतात, तिचे समर्थनही करतात, आणि गुरुही करतात. 
    *गाडगेबाबा अस का बोलायचे ?*  याविषयी थोडा आनखी विचार करू. आपण नेहमी पाहत असतो की, गुरू आपल्या विरूद्ध कधीच शिष्याला शंका घेऊ देत नाही. त्याच्या अस्तित्वाला आव्हान देणारे प्रश्न तो कधी विचारू देत नाही. त्याने सांगितलेल्या माहीती ( गुरूच्या मते ज्ञाना ) ची चिकित्सा करू देत नाही. म्हणजे " माझ्यावर श्रद्धा ठेवा. " हेच वाक्य प्रत्येक वेळी शिष्याच्या मेंदूवर अप्रत्यक्षपणे बिंबवल्या जात असत. यातून तयार होतात भक्त.  ( ही प्रक्रिया राजकारण आणि समाजकारणातही घडत असते. ) अश्या भक्तांचा  'गुरू ' खोट जरी बोलला,  गंभीर गुन्हा करून तुरूंगात जरी गेला तरीही ते भक्त मात्र, *" आमचा नेता, गुरू,  आमचे बापू निरपराध आहेत. त्यांना फसवल्या गेल आहे. "* असच ओरडून ओरडून सांगत असतात. आंधळ्या सारखे वागत असतात. *हे प्रत्येक क्षेत्रात, धर्मात थोड्याफार फरकाने पाहायला मिळत.*
( म्हणजे , *गुरू किंवा कुणीही ऐखात वाक्य , माहिती, घटना, चमत्कार सांगितला की त्याची चिकित्सा करायची नाही, तपासायचे नाही, पुरावा मागायचा नाही म्हणजे शब्दप्रामाण्य मानने होय.*)  
    ऐकीकडे गाडगेबाबांचे, संतांचे विचार सांगत प्रबोधन करायच, त्यांचे विचार आदर्श म्हणायचे तर, दुसरीकडे  मेंदूत अचिकित्सक विचार प्रक्रीया सुरू करून अचिकित्सक, अंधश्रद्धाळू समाज तयार करणा-या गुरूपोर्णिमा या दिवसाचे कौतुक करायचे ?  मला वाटत हा विरोधाभास ठरेल.  
  आज शाळेत शिक्षण देणारे गुरू (शिक्षक) आणि शिष्य (विद्यार्थी) यांच्यातील नाते  'ज्ञानरचनावाद ' या सिद्धांतावर आधारित नव्या अभ्यासक्रमाने अधिक स्पष्ट झाले आहे. आता, *गुरू (शिक्षक) हा ' सुलभक ' (अध्यापणाची प्रक्रीया सहज/सोपी करणारा) आहे. म्हणजे विद्यार्थी आपल्या ज्ञानाची रचना स्वःअनुभव घेत निर्माण करेल. शिक्षक फक्त ती प्रक्रीता सहज /सुलभ होईल याची काळजी घेईल, हे अपेक्षित आहे.  हा खरा गुरू. जो शिष्याला प्रश्न विचारू देण्यासाठी,  बुद्धीप्रामाण्यवादी, (प्रत्येक बाब चिकित्सकपणे तपासून सत्य स्वीकारणारा ) होण्याकरिता झटेल.*            

      काहींच मत असेल की, "जीवनात मार्गदर्शक हवा असतो, तोच आमचा गुरू. " 
  ठिक आहे , जर कुणी स्वतःची चिकित्सा करू देणारा, स्वतः विरूद्ध प्रश्न विचारू देणारा, शिष्याला बुद्धिप्रामाण्यवादी होण्यास मदत करणारा गुरू (मार्गदर्शक) कोणी असेल तर, तो 'सुलभक' ठरतो, त्याला विरोध नाहीच. परंतू  सहसा अस घडत नसत. *कारण की, सामाजिक जीवनातील धार्मिक 'मार्गदर्शक' (गुरू) म्हणून बापू,  बाबा, महाराज, स्वामी, अम्मा मार्गदर्शन करता करता 'मार्ग' सोडून फक्त 'दर्शन ' द्यायला लागतात.* हा प्रकार जागृत समाज घडवण्याच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहे. बाकी आपण सुजाण आहात....  चला सुलभक शोधुया.... 
दि. 31/07/15
✏- *पंकज वंजारे*,  महाराष्ट्र राज्य संघटक अ.भा.अंनिस - युवा शाखा  9890578583

मंगळवार, २३ जून, २०२०

समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या घरी

⭕ प्रा. श्याम मानव सरांच्या मार्गदर्शनात युवा शाखा - कार्यकर्त्यांची बैठक ⭕

★ समुपदेशनाची वारी व इतर उपक्रमांची देण्यात आली सविस्तर माहिती ★

     दि. 22 जून 2020 रोजी रात्री 8 वाजता विशेष Skype group वर प्रा. श्याम मानव सरांच्या मार्गदर्शनात युवा शाखा  - सक्रिय प्रमुख कार्यकर्त्यांची (कोअर गृप टिम)  बैठक आयोजित करण्यात आली होती.  
            महाराष्ट्र राज्य संघटक अ. भा.अंनिस - युवा शा. मा.पंकज वंजारे सरांनी सर्वप्रथम अ भा अंनिस संस्थापक -  राष्ट्रीय संघटक मा. प्रा. श्याम मानव सरांना गेल्या तीन वर्षात विदर्भात युवा शाखे द्वारे आयोजित शिबिर, उपक्रम, online व्याख्यानमाला, प्रबोधन अभियानासह समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी या सुरू असलेल्या वारी उपक्रमाचा उद्देश, तिचे स्वरूप सोबतच त्या अंतर्गत सुरू असलेली युवा संघटन बांधणी विषयीची थोडक्यात माहिती दिली.

त्या नंतर....
युवा शाखेद्वारा 1मे 2020 रोजी व्याख्यानमाला तसेच 9 मे 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या समुपदेशनची वारी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दारी '1call स्वतःसाठी' या उपक्रमाचा जिल्हानिहाय अहवाल बैठकीत  सादर करण्यात आला. यात किती विद्यार्थी सहभागी झाले ? कोणत्या अडचणी आल्या,  कोण कोण मान्यवर, जेष्ठ पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते व त्यांनी सदिच्छा- मार्गदर्शक केले याची इतंभूत माहिती सरांना देण्यात आली.  

यात...
● अ भा अंनिस बुलढाणा युवा शाखा संघटक अविनाश खिल्लारे यांनी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या 3 दिवसीय वारीच्या सेशनचा अहवाल सादर केला. 
● अ.भा.अंनिस अमरावती जिल्हा सचिव हरीश केदार यांनी 
अमरावती येथे 4 दिवसीय समुपदेशनाची वारी विषयीचा अहवाल सादर केला. 
●अ. भ. अंनिस जिल्हा उपाध्यक्ष यु. शाखा नागपूर सुरेंद्र वानखडे यांनी नंदूरबार जिल्ह्यातील झालेल्या 2 दिवसीय  सेशन विषयी सविस्तर माहिती दिली.
●अ. भा.अंनिस यवतमाळ जिल्हा संघटक यु.शाखा तथा विचार प्रसार प्रमुख कु. सेजल शशिकांत फेंडर यांनी यवतमाळ 3 दिवस व गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसीय आयोजित   झालेल्या समुपदेशनाची वारी बद्दल सविस्तर अहवाल सादर केला. 
●अ भा अंनिस वर्धा  जिल्हा सहसंघटक यु. शाखा सुमित लता प्रकाश उगेमुगे यांनी वर्धा 2 दिवस व वाशीम येथे झालेल्या 3 दिवसीय शेषन विषयी अहवाल सादर केला.
● अ भा अंनिस नागपूर जिल्हा यु.शाखा संघटक श्रावण खुदरे यांनी नागपूर 2 दिवस व भंडारा  येथे झालेल्या दोन दिवसीय सेशन विषयी सविस्तरपणे मांडणी केली.
●अ.भा.अंनिस यु. शाखा राज्य उपक्रम  नियोजन व संपर्क प्रमुख हर्षाली लोहकरे यांनी चंद्रपूर - गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात एकत्रित समुपदेशनाची वारीच्या दोन दिवसीय  सेशन बद्दल सविस्तर माहिती दिली..
   सोबतच पुढील काळात युवा शाखे द्वारे राज्य स्तरावर काय उपक्रम आयोजित केले जाणार आहेत व पुढील वाटचाल काय राहील या विषयी सविस्तरपणे मांडणी त्यांनी केली. 
● अ भा अंनिस नागपूर महानगर  सचिव यु. शाखा मंजुषा खुदरे मॅडम,

●अ भा अंनिस उत्तर महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख नरेंद्र पाटील,

●अ भा अंनिस समुद्रपूर ता. युवा शा. संघटक तथा IT प्रमुख संजीत ढोके,

●अ भा अंनिस वर्धा युवा शाखा ई-सम्पर्क प्रमुख यु.शाखा अथर्व भिंगारे

●अ भा अंनिस देवळी ता संघटक यु. शाखा स्वप्नील सरडे यानी आपला परिचय देत आपल्या कार्याची माहीती दिली.
      प्रा. श्याम मानव सरांनी यावेळी बहुमुल्य, उत्साह वाढवणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या नंतर बैठकीत युवा शाखेच्या कोअर टीम सदस्यांनी मा. श्याम मानव सरां सोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. मा. पंकज वंजारे सरांनी आभार मानले.

या नंतर बैठकीत  झालेल्या चर्चेत 
निलेश मीसाळ-जिल्हा संघटक युवा शाखा- वाशीम, युवराज राठोड - यु शा वाशीम, आशिष मोडक -ता. सचिव वर्धा, उमेश खर्डे- यु.शा तालुका संघटक बुलढाणा , निखिलेश चांबरे- जिल्हा संघटक युवा. शाखा चंद्रपूर, सोनिया डोंगरे -जिल्हा संघटक यु शा. भंडारा, प्रा. बालाजी दमकोंडवार- ता. संघटक ब्रह्मपुरी , विपस्तना सुरडकर चिखली ता. संघटक जि. बुलढाणा, रिंकेश भिसे, यु. शा. अचलपूर, राम देशमुख यु. शा. अमरावती, कांचन ठाकरे, यु शा. नागपूर, प्रज्वल निंबार्ते- भंडारा यु. शा. जिल्हा सचिव, प्रतिक्षा कापगते , यु शा साकोली जि भंडारा, वैभव माळी, जि. युवा शाखा संघटक नंदूरबार, तुषार चव्हाण गोंदिया, अमृता अदावडे -जिल्हा सचिव यु. शा नागपूर, प्रफुल बावणे यु. शा. उमरेड, अनिकेत कांबळे हिंगणघाट या सक्रिय युवा कार्यकर्त्यांना झालेल्या विशेष बैठकीचा अहवाल लवकरच ई- बैठक घेऊन सांगितला जाईल असे , बैठकीत शेवटी ठरले. 
यानंतर दोन तास चाललेली बैठक संपली. 

- हरिष केदार
जिल्हा सचिव अ.भा.अंनिस 
अमरावती

गुरुवार, १८ जून, २०२०



सदस्यता नोंदणी अभियान


चला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सामील होऊया !

सदस्यता नोंदणी अभियान 

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती

नोंदनी फक़्त 

३१ मे २०२० पर्यंत 


.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सभासद होण्यासाठी 

खालील लिंकवर जावून लगेच निःशुल्क फॉर्म भरून

 .भा.अंनिस चे सभासद व्हा


सदस्यता नोंदणी लिंक




समितीमध्ये नव्याने काम करू इच्छिाणाऱ्या  

प्रत्येकाने कृपया हा सदस्यता फॉर्म भरावा...

अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा !


समुपदेशनाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी