अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

बुधवार, २३ जुलै, २०१४

ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!


ज्योतिष किती खरे? किती खोटे? फलज्योतिष विज्ञान आहे काय? या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव आणि ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आज खामगावात आमनेसामने भिडणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी खामगावातील नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता हे आयोजन केले आहे. गेल्या २५ वर्षांत ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवा, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कुठलाही ज्योतिषी वा ज्योतिषी महामंडळाचा पदाधिकारी पुढे आला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर नंदकिशोर जकातदारांनी ज्योतिष हे विज्ञान आहे? या विषयावर बोलण्याची तयारी दाखविली, हे महत्त्वाचे आहे. अंनिसच्या वतीने जगभरातील ज्योतिष्यांना सोबतच्या लेखातील १४ प्रश्न नेहमी विचारले जातात. आजपर्यंत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीही देऊ शकले नाहीत. बघूया आज काय होते ते.- संपादक१) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? ३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? ४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्‍वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत आहे? ५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणा?र्‍या कुंडल्या किती विश्‍वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणा?र्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? ६) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? ७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही

सरकारला करावी काय? ८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? ९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणा?र्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? १0) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्‍चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षांनंतर तो निश्‍चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्‍चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? ११) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? १२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३0 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रय▪करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? १३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? १४) दोनदा २0-२0 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९0 टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९0 टक्के ख?र्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९0 टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७0 टक्के जरी खरी निघाली (दोनदा २0-२0) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - ९३७१0१४८३२

मंगळवार, २० मे, २०१४



प्रर्यावरणप्रेमी व प्राणीमित्र सर्पमित्र, सर्पतज्ञ,

कैलास दारोळे 

यांचे दि.17 मे 2014 रोजी दूखःद निधन झाले त्याच्या या योगदानाचा 

सन्मान करण्यासाठी कैलास दारोळे सर्प मित्र 

रिवार व अभाअंनिस (मुंबई) मुंबईत आदरांजली सभा 

दि. 5 जून रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे  कृपया संपर्क साधा. 

शशी गमरे 9833634062 ,

सुर्यकांत जाधव  8108231255

चंद्रकांत सर्वगोड  9702195991.

सुनील कदम 9820221176 ,

चंद्रकांत जाधव  9323973604

समीर म्हात्रे म्हात्रे 9892958258 

मंगळवार, ११ मार्च, २०१४

सावरकरांचा सामाजिक समरसतेचा विचार समाजात मांडावा


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख हिंदुत्वनिष्ठ म्हणून असली तरी त्यांना पटत नसलेल्या हिंदूंच्या अनेक रूढी परंपरेवर त्यांनी प्रखर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजाला सामाजिक समरसतेचा विचार दिला आणि तो समाजात मांडला गेला पाहिजे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे देण्यात येणाऱ्या स्वा. सावरकर गौरव पुरस्कारासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवड केली आहे. समितीच्यावतीने श्याम मानव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ सदस्य उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकरे, सचिव मुकुंद पाचखेडे उपस्थित होते. अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदुत्वाचा विचार मांडताना सामाजिक विचारांचे भान ठेवत अंधश्रद्धेचा विचार मांडून तो कृतीत साकार केला आहे. हिंदूंच्या अनेक रूढी परंपरेवर त्यांनी टीका करून काही गोष्टी किती घातक आणि परंपरेला सोडून आहे हे त्यांनी दाखविले आहे. सावरकरांचे हिंदू प्रेम आणि मुस्लिमांविषयी त्यांना द्वेष होता असा अपप्रचार करण्यात आला होता. मात्र, त्यांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला कधीच वेगळे बघितले नाही. ते जेवढी टीका हिंदूंवर करीत तेवढीच मुस्लिम अन्य धर्मांवर करीत असे आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार करीत होते. सावरकरांनी मनुस्मृतीची इतकी चिरफाड केली की तेवढी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली नाही. हिंदूंचा नादानपणा त्यांनी दाखवित असताना मुस्लिम समाजाचा वेगळेपणा दाखविला. गाय या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी टीका केली होती. गाय हा उपयुक्त पशु आहे असे त्यांनी लिहिले. सावरकरांनी वैज्ञानिकदृष्टय़ा विचार मांडून प्रत्येक गोष्ट त्यांनी पटवून दिली आहे. सावरकरांची देव देवतावर श्रद्धा असली तरी त्यांना जे पटत नव्हते त्यावर परखडपणे विचार मांडत होते. सावरकरांनी सामाजिक विचार मांडला आणि त्या विचारातून संस्थेने पुरस्कार दिला. सावरकरांचे सामाजिक विचार मांडण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून त्यांनी प्रयत्न करावे, असेही मानव म्हणाले. यावेळी अशोक ठाकरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कुळकर्णी तर संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. दिनेश खुरगे यांनी केले. रंजना उपगडे यांनी गायलेल्या वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

अ. भा. अंधश्रध्दा निर्मूलन समिती - मुंबई विभाग



अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती १९८२ पासून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छतत्तिगड, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान इ. प्रदेशात जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीतआहे.

वैज्ञानिक दृष्टीकोण  समाजात रुजावा आणी अंधश्रध्दा पासून समाजाला दूर कराव ह्यासाठी 
समितीने जिल्हा - तालुका - गाव पातळीवर काम करण्याचे ठरवले असून, प्रतेक ठिकाणी स्थानिक कार्यकारणी निवडण्यात एईल प्रतेक कार्यकारणीत 
१) अध्यक्ष २) संघटक २) सचिव  
हि तीन पदे प्रमुख्याने निउक्त करण्यात अेतील . 
त्या नंतर कार्यकर्त्यांच्या संखे नुसार आणि कामाच्या पहाणीनुसार  कार्यकारणी वाढवण्यात येईल . 
कार्यकारणीणे पुढील उपक्रमांची आखणी करून समितीच्या राष्ट्रीय पातळीवरील 
पदाधिकार्यांशी संपर्क करावा 
मधुकर कांबळे - ९९३०३१२४९४
पुरूषोत्तम आवारे -९८९२१६२२४८
समितीच्या कामाच्या अधिक माहिती साठी समितीच्या ब्लॉगला आणि 
समितीच्या वेब साईट ला अवश्य भेट द्या
Add caption

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४