अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

कंब्बलवाले बाबा यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत तक्रार दाखल..

*अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती* 
मुंबई , मुंबई-उपनगर  जिल्हा यांच्या वतीने आज  दि.१६/०९/२०२३ रोजी दुपारी विक्रोळी पार्कसाईट सुर्यानगर विक्रोळी पच्क्षिम येथील साहाय्यक पोलिस निरिक्षिक यांच्याकडे कंब्बलवाले बाबा यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा तसेच ड्रग्ज ॲन्ड रेमिडीजॲक्ट अंतर्गत तक्रार  केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली  दाखल करण्यात आली आहे तरी यासमयी चंद्रकात सर्वगोड- मुंबई संघटक ,सुर्यकांत जाधव -भांडाफोड प्रमुख , सचिन हिंदळेकर -मुंबई-उपनगर संघटक , सुनिल मोरे- उपनगर सहसचिव , जे.के. साबळे उपनगर- खजिनदार , महेंद्र पवार तसेच सोनावणे हे कार्यकर्ते उपस्तीत होते..
तसेच महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे सर आपले राष्ट्रीय अध्यक्ष  मधुकर कांबळे साहेबांनी केलेल्या मार्गदर्शन केले.....🌞

अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाडॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार



अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
या संघटनेला शनिवारी ( ९ सप्टेंबर ) डॉ . गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने नागपुरात गौरविण्यात आलं .
डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र व सी . मो . झाडे फाउंडेशन या संस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारानिमित अंनिस व तिचे संस्थापक संघटक प्रा . श्याम मानव यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा .

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचा इतिहास मोठा रंजक आहे . १ ९ ८० च्या दशकात नागपुरात रॅशनलिस्ट असोसिएशन ही संघटना चर्चेत होती . तेव्हाचे नागपूर विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा . चंद्रशेखर पांडे , उमेश चौबे , पत्रकार म.य. दळवी ही मंडळी या असोसिएशनमध्ये कार्यरत होती . अंधश्रद्धा , बुवाबाजी , भोंदूगिरी अशा विषयांत चर्चा , व्याख्यानं , जनजागृती हे काम या असोसिएशनच्या माध्यमातून चालत असे . याच मंडळींनी पुढाकार घेऊन नंतर मानवीय नास्तिक मंचची स्थापना केली . सुधाकर जोशी , नागेश चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत सक्रिय होते . १ ९८१-८२ मध्ये विख्यात रॅशनॅलिस्ट बी . प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते . नागपुरात त्यांच्या इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करण्याचं काम श्याम मानवांनी केलं . मानवांनी तेव्हा इंग्रजीची प्राध्यापकी सोडून पत्रकारिता सुरू केली होती . ‘ तरुण भारत ' या दैनिकात ते युवकांचा स्तंभ चालवित असत . वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमध्येही ते सक्रिय होते . त्या काळात अब्राहम कोवूरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता . विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा , भोंदू महाराजांचं वाढलेलं प्रस्थ या विषयात काहीतरी केलं पाहिजे , हा मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असे . प्रेमानंदांच्या दौऱ्याने त्या विचाराला बळकटी आली . सर्वसामान्य लोकांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेला पाहिजे , यावर नास्तिक मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होऊन श्याम मानवांच्या नेतृत्वात डिसेंबर १ ९ ८२ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला . ' आमचा देवा धर्माला विरोध नाही . देवाधर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या , लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा आहे ' , ही भूमिका घेऊन या कामाला सुरुवात झाली .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १ ९९ ० चं दशक अक्षरश : गाजवून सोडलं होतं . समितीच्या कामाचा तेव्हा महाराष्ट्रभर गाजावाजा होता . श्याम मानव व त्यांची टीम जवळपास चार दशक विदर्भात हीरो होती . तो काळ काही फार जुना नाही . अगदी आता काही वर्षापूर्वीची वर्तमानपत्रं पाहिली तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पराक्रमाने रकानेच्या रकाने भरलेले आढळतील . स्थापनेनंतर लवकरच अंनिसने विदर्भात खळबळ उडवून दिली होती . चमत्कार व दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बुवा - महाराजांना समितीने आव्हानं देणं सुरू केले होते . बेबी राठोड , गुलाबबाबा , शेळकेबाबा , रज्जाक बाबा अशा अनेकांचा समितीने भंडाफोड केला आणि पायलटबाबा , कृपालू महाराज , बोलका पत्थरवाले पटवर्धन , अनेकांवर फजित सुंदरदास महाराज , नैनोदचा बाबा , शुकदास महाराज , आनंदीमाता , परिअम्मा , अशा अनेकांचे पितळ समितीने जनतेसमोर उघड केले . शकुंतलादेवीसारख्या होऊन नागपूर सोडण्याची पाळी आली होती . अलीकडच्या काही वर्षात कंबलवाले बाबा , ज्योतिषी नंदकिशोर जकातदार , पवन महाराज , तवेवाले बाबा , रवींद्र बाबा , डॉ . स्नेह देसाई , बागेश्वर बाबा आदींना पळवून लावण्याची कामगिरीही अंनिसच्या नावावर आहे . काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर श्याम मानव आणि बागेश्वर बाबा यांचे वादविवाद चांगलेच गाजले होते . गेल्या ४० वर्षात विदर्भातील प्रत्येक मोठय़ा शहरात समितीच्या शाखा स्थापन झाल्या आहेत . समितीच्या कार्याचा विस्तार केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , मुंबई , कोकण , खानदेशमध्येही झाला आहे . गुजरात , मध्यप्रदेश , गोवा , उत्तर प्रदेशातही श्याम मानव व त्यांचे कार्यकर्ते जाऊन आले . अनेक मोठे ज्योतिषी व महाराजांना आव्हान देण्याचं काम जोरात होतं . तेव्हा काहींनी तुमची संघटना मान्यताप्राप्त नाही , असा मुद्दा काढल्याने १ ९ ८६ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली . श्याम मानव हे अखिल भारतीय संस्थापक संघटक होते . पहिले अध्यक्ष प्रा . चंद्रशेखर पांडे , तर कार्याध्यक्षाची जबाबदारी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा . भा.ल. भोळे यांच्याकडे होती . उमेशबाबू चौबे , रूपाताई कुळकर्णी , हरीश देशमुख , नागेश चौधरी , सुधाकर चौधरी , सुरेश अग्रवाल ही मंडळी पदाधिकारी होती . अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उल्लेख आला की अनेकांच्या डोळ्यांसमोर बुवा -महाराजांचा भंडाफोड एवढीच एक गोष्ट येते . मात्र शेकडो भंडाफोड केले तरी नवनवीन बुवा – महाराज तयार होतच राहतात हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला विवेकी बनवणे . त्याला तर्क व बुद्धीने विचार करण्याची सवय लावण्याची आवश्यकता समितीच्या लक्षात आली . अंधश्रद्धांची निर्मिती का होते ?, माणसं ढोंगी , बुवा -महाराजांना शोषणाला बळी का पडतात ? महिलांचे देव -धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण का होते , याचा सखोल अभ्यास करून प्रा . श्याम मानव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांची आखणी केली . मानवी मेंदू , मन कसे काम करते हे लक्षात घेऊन स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा , कौटुंबिक स्वास्थ कार्यशाळा सुरू करण्यात आल्या . त्यातून विवेकी ब बुद्धीप्रामाण्यवादी कार्यकर्ते तयार होण्यास सुरुवात झाली . वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री - पुरुषांनीही या कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वत : च्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेत . अलीकडच्या काही वर्षात जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही आहे . जादूटोणाविरोधी - कायद्याचा मसुदा तयार करण्यात श्याम मानव यांचाच पुढाकार असल्याने त्यांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने या कायद्याच्या विषयात पोलिस अधिकारी , कर्मचारी व व वेगवेगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे . अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या विषयात सखोल अभ्यास करून ग्रामीण भागात कायद्याविषयी प्रबोधन सुरु केले आहे . अंनिसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून समाजप्रबोधनासाठी स्वत : ला समर्पित केल आहे .
असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी दिली आहेत . अनेक कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहे .

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

आव्हान स्वीकारें बिना भाग गया धीरेन्द्र शास्त्री

*भगोड़ा निकला पाखंडी धीरेन्द्र शास्त्री* - श्याम मानव

*30 लाख का आव्हान स्वीकारें बिना भाग गया* धीरेन्द्र शास्त्री ।

*गडकरी, फडणवीस* और कही *आमदारो* ने *आशीर्वाद* लिया ।🌞

👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/gon7_BMXY8U

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

धीरेंद्र कृष्णजी महाराज चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाख घेऊन जा


*धीरेंद्र कृष्णजी महाराज👳🏼‍♀️*
*👉🏻चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाख घेऊन जा*💥
 *👉🏻अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समतीचे आव्हान*

*श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांना चमत्कार , दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे ३० लाखांचे आव्हान -* प्रा . श्याम मानव

 *सा . पो . आयुक्तांना कार्यवाही करण्याबाबत दिले निवेदन*
 
नागपूर -' दिव्यशक्ती असते , चमत्कार होतात , आपण कुणाचेही नाव , आजार , मनातील ओळखू शकतो ' असा दावा बागेश्वर धामचे पीठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज करतात . त्यांना ' चमत्कार , दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे ' ३० लाखांचे खुले आव्हान देण्यात येत आहे .

*त्यांच्या विरुद्ध जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्ज ॲन्ड मॅजिक रेमेडीज कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन रोशन पंडित एसीपी क्राईम , प्रधान दक्षता अधिकारी , जादूटोणा विरोधी कायदा , नागपूर यांना रविवार दि . ८ रोजी देण्यात आली आहे . शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती , प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी ( पीआयएमसी ) समितीचे सहअध्यक्ष तथा अ . भा . अंनिसचे संस्थापक प्रा . श्याम मानव यांच्यासमवेत हरिश देशमुख , सुरेश झुरमुरे , प्रशांत सपाटे , भगवान खराते , सुनिल वंजारी , राजेश वानखेडे , राजू नाईक यांनी हे निवेदन दिले .

 याविषयीची माहिती प्रा . श्याम मानव यांनी आज सोमवार दि . ९ रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिली . सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , महाराष्ट्र राज्य अंतर्गत पीआयएमसी तर्फे निवेदन देण्यात आले . प्रा . श्याम मानव यांनी पुढे सांगितले , ' प्रधान दक्षता अधिकारी यांना स्वतःहून कार्यवाही करण्याचा अधिकार आहे . या कायद्याअंतर्गत दोषसिध्दी नंतर ६ महिने ते ७ वर्षे कारावास आणि ५ हजार ते ५० हजार रुपये दंड एवढी शिक्षेचा अंतर्भाव आहे . 
 • ' श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज , बागेश्वर धाम , जि . छत्तरपूर , मध्यप्रदेश यांचे नागपूर येथे सध्या श्री रामकथा प्रवचन निमित्त आगमन झाले आहे . श्री रामकथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे . त्यांचे आम्ही स्वागतही करतो आणि आदरही करतो . पण याच निमित्ताने ते ' दिव्य दरबार ' आणि ' प्रेत दरबार ' ( त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ) आयोजित करताहेत , केलाही आहे . दिव्य दरबाराचे त्यांचे अनेक व्हिडिओज यूट्यूब वर उपलब्ध आहेत . त्यामध्ये केलेल्या दिव्य शक्तीच्या दाव्याने , प्रयोगाने प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणावर देशातील व नागपूर परिसरातील लोक महाराजांच्या भजनी लागताहेत . अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ४० वर्षे महाराष्ट्र आणि देशात विविध राज्यात काम करते आहे . देवा - धर्माला विरोध नाही पण देव - धर्माच्या नावावर सामान्य जनतेची लुबाडणूक , फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पाऊले उचलून जनतेला फसवणूक व शोषणापासून वाचवणे आणि त्यांचे प्रबोधन करणे ही समितीची भूमिका आहे , कार्य आहे . श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांच्या या दिव्यशक्तीच्या दाव्यांना आणि प्रयोगांना अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे खुले आव्हान जाहीर आहे . प्रा . श्याम मानव यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली . त्यांनी श्री धिरेंद्र कृष्णजी महाराजांच्या दरबारातील व्हिडिओतील त्यांच्या द्वारे चमत्कार , दिव्यशक्तींच्या केलेल्या दाव्यांचे पुरावे यावेळी पत्रकारांसमोर सादर केले .
 
 महाराजांचे व्हिडिओज मधील चमत्कारीक दावे
भक्तांच्या समस्या दिव्य शक्तीद्वारे महाराजांना आपोआप कळतात , असा दावा महाराज करतांना दिसतात . अशा प्रकारचे दावे महाराजांनी अनेक व्हिडिओजमध्ये केले आहे .
 
*महाराज काय दावा करत आहे ?*

 ( अ ) *महाराज कुणाचेही वय आणि नाव ओळखून अचूक सांगू शकतात .* 
( ब ) *महाराज कुणाचाही मोबाईल नंबर त्या व्यक्तीचे नाव माहीत नसताना सांगू शकतात .* 
( क ) *महाराज कुणाच्याही घरातील वस्तू सांगू शकतात*

असे दावे त्यांच्या वरील व्हिडिओत केले आहेत . वय , नाव , मोबाईल नंबर आपोआप ओळखणे हे मानवी शक्तीला शक्य नाही . दुसऱ्याच्या घरातील वस्तू आपोआप ओळखणे ( Clairyonce ) हेही शक्य नाही . असे सांगत श्याम मानव यांनी श्री धीरेंद्र कृष्णजी महाराजांना त्यांची ही दैवी शक्ती वा दैवी कृपा Fraud and Proof Condition मध्ये सिद्ध करण्याचे जाहीर आव्हान महाराजांना दिले आहे .🌞🖋️